बसणी गाव हा इनाम म्हणून मिळालेला गाव आहे. इनामदार म्हणून लेले होते. या गावामध्ये पुरातन अशी सात मंदिरे आहेत. त्यापैकी एक ग्रामदेवता श्री महालक्ष्मी व श्री देव रवळनाथ हे आहेत. या गावाचे वैशिष्ट म्हणजे या देवांचे मानकरी हे देवीच्या परिसराच्या अवतीभवती आहेत. त्यामध्ये खोत, गावडा, तेली, न्हावी, गावकर इत्यादी आहेत. पांडव कालीन पुरातन पोखरबाव विहीर व गवाणाचे तलाव आहे. गवाणाच्या तलावाच्या ठिकाणी श्री देव रवळनाथाचे स्थान आहे. बसणी मध्ये महालक्ष्मी देवीच्या पाऊलखुणा आहेत. या गावाचे वैशिष्ट म्हणजे हे गाव डोंगरदऱ्या समुद्राच्या मध्ये वसलेले आहे.
ग्रामपंचायत बसणी ही स्थानिक स्वराज्य संस्था गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. गावातील नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे ग्रामपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
स्वच्छ, सुंदर व हरित बसणी गाव घडविण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे व शासकीय योजना राबविण्यात येतात. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण उपक्रम, तसेच सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठीचे विविध उपक्रम यशस्वीपणे गावात अंमलात आणले जातात.
गावातील लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या सक्रिय सहभागातून ग्रामपंचायत बसणी ही पंचायतराज व्यवस्थेच्या बळकटीसह सर्वसमावेशक व शाश्वत ग्रामीण विकास साधण्याचे ध्येय बाळगून काम करते.
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. उदय सामंत
मा. मंत्री, उद्योग
तथा मा. पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री,
ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. मनुज जिंदल (भा.प्र.से.)
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, रत्नागिरी
श्रीम. वैदेही मनोज रानडे (भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी जिल्हा परिषद